समता प्रतिष्ठान,
मंगळवार पेठ, पुणे
८ वा वर्धापन दिन
क्रांती. सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्तसमता प्रतिष्ठान, पुणे चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात "मी सावित्री बोलतेय" हा एकपात्री प्रयोग भक्ती प्रधान या मुलीने सादर करून झाली.
अत्यंत सुंदर असे सादरीकरण तिने केले. सर्व पालक आणि विद्यार्थी तिच्या अभिनयाने मंत्रमुग्ध झाले. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि वक्तृत्व याप्रकारे आपली कला सर्वांसमोर सादर केली. मुलींचे नृत्य पाहून पालकांनी आणि पाहुण्यांनी विशेष दादही दिली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निशाद शेख व साक्षी जाधव, सानिका सरोज यांनी केले. मदत करणा-या सर्वांचे आभार समृद्धी पाटोळे या विद्यार्थीनीनी केले. यावेळे समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते अमन शेख, सम्यक चव्हाण, राज कदम, तनिष्क उबाळे, मयूर ढावरे, सौरभ वेळेकर, प्राजक्ता कांबळे, अदिती साठे, निशांत वाघमारे, साक्षी शर्मा, संतोष शर्मा, कार्तिक शेलार या सर्वांनी या कार्यक्रमाच्या नियोजनात मदत केली.
श्री. हरेश सूळ यांनी सर्व मुलांचे कौतूक केले. ग्रामीण भागात असे उपक्रम नव्हते त्यामुळे आम्हाला असं काही शिकायला मिळालं नाही. त्याचा परिणाम आत्मविश्वास कमी होता. मात्र समता प्रतिष्ठान अभ्यासिकांच्या मार्फत करत असलेले काम हे अत्यंत महत्वाचे असून याचा उपयोग भविष्यात नक्कीच मुलांना होईल. पालकांनी यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी काहीही मदत, सहकार्य हवं असेल तर आम्ही करू असे आश्वासनही त्यांनी दिले.
डॉ. भक्ती वारे मॅडम, श्रीमती माळी मॅडम यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करत समताच्या कामास शुभेच्च्छा दिल्या.
यावेळी अभ्यासिकेतील ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याचबरोबर उत्तम सादरीकरण करणा-या मुलांना पारितोषिकही देण्यांत आली. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून श्री. हरेश सूळ ( अपर तहसिलदार व परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी, खेड ) डॉ. भक्ती वारे ( होमियोपॅथी ), श्रीमती माळी मॅडम ( शारदा संस्था ), समताचे पदाधिकारी व विश्वस्त श्री. शुभम वेळेकर, सौ. रेखा गायकवाड, सौ. अमृता मोरे हे उपस्थित होते. यावेळी समता प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संदीप मोरे यांनी प्रास्ताविक केले. आजच्या काळातील समताच्या कामाची गरज आणि त्याकरीता शिक्षणाचे माध्यम का महत्वाचे आहे हे त्यांनी सर्वांना सांगितले. समताने वर्षभर केलेल्या विशेष कामे, प्रकल्प याबद्दल माहिती दिली.
















.jpg)




















No comments:
Post a Comment