समता प्रतिष्ठान,
(मंगळवार पेठ, पुणे)
५ वा वर्धापन दिन कार्यक्रम
दि. ३ जानेवारी २०१९ रोजी समता प्रतिष्ठान, पुणे या संस्थेला
५ वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने सर्व कार्यकर्ते यांनी अतुल पेठे यांचा कार्यक्रम
घेतला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला काही विद्यार्थी यांनी गीत व मनोगते सादर केली.
यामध्ये श्रेया मोरे हिने बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर
वक्तृत्व सादर केले. तसेच सायली उबाळे या ८ वीतल्या मुलीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांची गोष्टही मुलांनी इंग्रजीत सादर केली.
अतुल पेठे यांनी सर्व उपस्थितांना स्त्रियांची होणारी कुटुंबातील
मानसिक कुचबंना आणि दुय्यम स्थान यावर खूप छान मांडणी केली.
त्याच बरोबर मुलींनी शिक्षणासाठी अत्यंत कष्ट जरी असले
तरी शिक्षण पूर्ण करावे असेही सांगितले.
स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि सचोटी असेल तुम्ही हवे ते यश
आयुष्यात मिळवू शकता हे त्यांनी विशेष करून सांगितले.


No comments:
Post a Comment