"गोष्टरंग" - एक मजेदार नाट्य अनुभव
गोष्टरंग.
दिवाळी सणाच्या निमित्ताने समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे
दरवर्षी विविध उपक्रम विद्यार्थ्यांकरिता राबवीत असते. दिवाळी शिबीर, दिवाळी सहल, दिवाळी भेट.
''क्वेस्ट'' संस्थेच्या, माध्यमातून. शिक्षण क्षेत्रात भाषा आणि गणित यासाठी विशेष उल्लेखनीय असं काम करणारी पालघर, सानोळा येथील संस्था.
देशविदेशातील लहान मुलांसाठी तयार केलेल्या गोष्टी.
या गोष्टींचं अप्रतिम असं मनोरंजनात्मक सादरीकरण.
हा कार्यक्रम आम्ही समता प्रतिष्ठानच्या आणि पुणे मनपा कामगार युनियन च्या सहकार्याने
दि. २३ ऑक्टोबर २०१९ सांयकाळी ६ ते ८ यावेळात श्रमिक भवन, शिवाजीनगर येथे सादरीकरण करण्यात आले.

केवळ टी.व्ही आणि मोबाईल च्या जाळ्यात गुंग असलेली आजची बालगोपाळांची आणि युवकांची पिढी आपण आज अवती भवती पाहत आहोत. म्हणूनच आम्ही समता प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून त्यांना सतत त्यांच्यातील सुप्त गुण, जाणीवा समृद्ध करण्याचा प्रयत्न मागील ५ वर्षांपासून करीत आहोत.

या आमच्या कामात क्वेस्ट सारख्या सामाजिक भान असलेल्या संस्था, व्यक्ती मदतीला धावून येतात त्यामुळे आजपर्यंत आमचं हे काम अविरत चालू आहे.
सर्व गोष्टरंग टीमची अदभूत अशी ऊर्जा पाहून केवळ आणि केवळ आश्चर्य वाटत राहते. मुलांच्या मनोभावना, कल्पना यांचा सुयोग्य असा विचार करून लिहीलेल्या गोष्टी, गाणी जबरदस्त. त्यातच अप्रतिम असे गीतांजली ताईं कुलकर्णी यांचे दिग्दर्शन यासाठी शब्दच नाहीत.
कमीत कमी साहित्य, रंगमंच यांचा चपळतेने केलेला उपयोग केवळ अवार्णिनीय असाच होता. त्यात इतर देशातील माहित नसलेल्या भूभागातील लोकांच्या गोष्टी योग्य भावभावनांच्या माध्यमातून केलेलं सादरीकरण खूपच मनाला स्पर्श करणारे होते.
याची प्रचिती म्हणजे कलाकारांबरोबर मुलंदेखील गात होती, प्रतिसाद देत होती, रमून जात होती. यालाच तादात्म्य पावणं असं म्हणत असावेत बहुतेक. यातच संपूर्ण कलाकारांचे खरे यश दडले आहे. संपूर्ण शरीर आणि हावभावाचा उपयोग कसा करावा याच उत्तम उदाहरण हे या कलाकारांनी घालून दिलेलं आहे.
येवढ्यावेळ ५ वी ते १० वी च्या गटातील विद्यार्थी असा मनमुराद आनंद घेत एखाद्या नाटकाच्या विषयात रंगून जाणं हा अनुभव आमच्यासाठी तरी अगदी नवीनच होता.

याची प्रचिती म्हणजे कलाकारांबरोबर मुलंदेखील गात होती, प्रतिसाद देत होती, रमून जात होती. यालाच तादात्म्य पावणं असं म्हणत असावेत बहुतेक. यातच संपूर्ण कलाकारांचे खरे यश दडले आहे. संपूर्ण शरीर आणि हावभावाचा उपयोग कसा करावा याच उत्तम उदाहरण हे या कलाकारांनी घालून दिलेलं आहे.
येवढ्यावेळ ५ वी ते १० वी च्या गटातील विद्यार्थी असा मनमुराद आनंद घेत एखाद्या नाटकाच्या विषयात रंगून जाणं हा अनुभव आमच्यासाठी तरी अगदी नवीनच होता.
जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. आपण नाममात्र शुल्कात आमच्या वस्तीपातळीवरील मुलांसाठी केलेलं हे योगदान नक्कीच भविष्यात त्यांच्या आयुष्यात लक्षात राहणारे आणि उपयोगी पडेल असेच आहे.
Great work SIR,,, 👌
ReplyDelete